पहिल्या पावसात भिजताना,
त्या रोमांचित एकांतात
नजरेनेच म्हणालास ....
जवळ ये अशी जरा ... मिठीत घेतो सामावून
दोघांची मनंही जरा चिंब होऊ देत ना भिजून
बुडालेच होते आकंठ तुझ्या प्रणय सागरात मीही
मग कशी म्हणू शकले असते तुला " नाही "
वाराही खट्याळ झोंबत होता अंगाला
राहिलेच नाही मग अंतर दोघांत जरा
सरींवर सरी ओघळती गालावरी
नजर तुझी खिळली अधरांवरी
लाज लाजूनी मी पुरती अशी मोहरले
विसरूनी सारे काही तुझ्या बाहूपाशात हरवले
आता तू नसताना .........
राहून राहून सारे आठवते
भिजलेले क्षण ते मोरपिशी
पुन्हा ह्रुदयी साठवते !!!!
No comments:
Post a Comment